मित्रांनो आज दिनांक 25 एप्रिल सकाळी 4 वाजुन 35 मिनिटांनी मंगळ राशी परिवर्तन करणार असून ते मेष राशीतुन वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. दिनांक 13 मे परेंत ते याच राशीत राहणार असून 13 मे च्या उत्तर रात्री 1 वाजून 15 मिनिटांनी ते ऋषभ राशीतून गोचर करून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाचा शुभ प्रभाव व्यक्तीच्या साहस पराक्रम आणि शरीरावर पडत असतो.
ज्योतिष शास्त्रानुसार मंगळाच्या या राशी परिवर्तनाचा संपूर्ण बारा राशींवर शुभ अथवा अशुभ प्रभाव पडणार असून मंगळाचे होणारे हे परिवर्तन कन्या राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. ज्या राशीवर मंगळाची शुभ कृपा बरस्ते आशा राशींच्या जातकांचे भाग्य चमकायला वेळ लागत नाही. मंगळ आपल्या राशीच्या नव्या स्थानी गोचर करत आहे.
मंगळाच्या शुभ प्रभावाने आपल्या उर्जे मध्ये वाढ होणार असून साहस आणि पराक्रमामध्ये वृद्धी होणार आहे. मंगळाचा शुभ प्रभाव जेंव्हा मनुष्याच्या जीवनावर पडतो तेंव्हा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. उद्योग व्यापार आणि करियर मध्ये अतिशय सुंदर प्रगती घडून येण्याचे योग्य आहेत. सोबतच पारिवारिक आणि सांसारिक सुखात वाढ होऊन वैवाहिक जीवन आनंदाने भरून येणार आहे.
कुंडलीमध्ये मंगळाची शुभ स्थिती राजयोग घडवून आणत असते. आपल्याही जीवनात अशाच काही शुभ आणि सुंदर घटना घडून येणार असून आपले नशीब चमकण्यास सुरवात होणार आहे. मंगळाचे राशीपरिवर्तन कन्या राशीसाठी यशदाई सिद्ध होणार आहे. अय सुख समृद्धीमध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेऊ शकता.
आपल्या भोग विलासेच्या साधनांची प्राप्ती होणार असून ऐश्वर्याच्या वाढ होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापार आणि कार्य क्षेत्राचा मोठा विस्तार घडून येणार असून व्यवसायातून आर्थिक अबक वाढणार आहे. मंगळाच्या कृपेने सुख समृद्धी आणि आंनदाणे आपले जीवन बहरून येणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार असून काम करण्याच्या उर्जेमध्ये वाढ होणार आहे.
सांसारिक सुखात मोठी वाढ दिसून येईल. या काळात पारिवारिक सुखात अतिशय शुभ घटना घडून येणार आहेत. परिवारात चालू असणारा कलह मिटून आनंदात वाढ होणार आहे. समाजात मान सन्मानाचे योग बनून येणार आहेत. स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्याच्या अनेक संधी आपल्याला प्राप्त होणार आहेत. कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल.
नोकरीत वरिष्ठ आपल्यावर खुश असतील पण वरिष्ठांशी नम्रतेने वागणे गरजेचे आहे. जीवनात निर्माण झालेल्या प्रत्येक संकटांवर विजय प्राप्त करणार आहात. कोर्ट कचेऱ्यात अनेक दिवसांपासून चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. भौतिक सुख समृद्धी बरोबरच अध्यात्मिक सुखाची प्राप्ती होणार असून तिजोरीमध्ये पैस्याची भर पडणार आहे.
यश प्राप्तीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. या काळात आपल्या महत्वकांक्षेत मोठी वाढ दिसून येईल. या काळात संतत्तीची प्रगती पाहून मन आनंदाने बहरून येणार आहे. आपण बनवलेल्या योजना सफल ठरणार आहेत.
तुमची कुंडली व राशिभविष्य तुमच्या ग्रहांन वर अवलंबून असते. आणि त्याला अनुसरून तुमच्या जीवनात गोष्टी घडत असतात यात काही फरक देखील असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही कोणत्याही पंडित ला किंवा ज्योतिषशास्त्र ला दाखवू शकता.